Posts

Ati Tithe Mati

Image
 Ati Tithe Mati अति तेथे माती मित्रांनो यश आणि प्रसिद्धी सहजा सहजी मिळत नाही आणि मिळाली तरी काही जणांना ती टिकवून ठेवता येत नाही. मिळालेल्या गोष्टीचा मनुष्यप्राणी अतिरेक करायला लागतो आणि आत्ता पर्यन्त जे काही कमावले त्याची माती करून टाकतो. एका गावात एक गरीब शेतकरी होता, तो शेतात राबराब रबायचा पण पण निसर्गामुळे म्हणा किंवा त्याच्या नशिबामुळे म्हणा त्याला त्याच्या कामात यश मिळत नव्हत. तो देवाची विनवणी करू लागला. त्याची ती दशा पाहून देवाला फार वाईट वाटले. एके दिवशी तो शेतकरी आत्महत्येचा विचार करत बसला होता. त्याच वेळी देव त्याच्या समोर प्रकट झाला आणि त्याला म्हणाला "तुला काय अपेक्षित आहे ते माग, मी तुला ते देईन. धन, धान्य, वस्त्र, गृह, सुख, शांती, यश, प्रसिद्धी काय हवे ते माग, पण जे मागशील ते तुला तुझ्या झोळीत घ्यावं लागेल. मी जे देईन ते घेताना त्यातील एक कण जरी झोळीतून खाली पडला तर सर्व काही नाहीसे होईल." शेतकऱ्याने विचार केला जर आपल्याकडे धन आले तर बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला आपसूकच मिळतील. त्याने देवाकडे धनाची अपेक्षा केली आणि आपली झोळी उघडली. त्याचक्षणी देवाने त्याला थोडे

How to write

Image
 How to write लेखन कसे करावे लेखन हे सध्या खूप प्रतिष्ठित करियर आहे. लेखकांना त्यांनी केलेले लिखाण सर्वांनी वाचावे असे वाटते. पण काही काही वेळेस लेखनास सुरवात कुठून करावी तेच सुचत नाही. माझ्यामते लेखकाने वाचकांकडून अपेक्षा करण्या आधी स्वतःच्या अपेक्षेची पूर्तता करावी. प्रत्येक लेखकाची एक वेगळी थाटणी असते त्या थाटाणितच तो लेखन करतो. लेख लिहिताना काही निकष डोळ्यासमोर ठेवावे लागतात. हे सर्व करताना बराच वेळ खर्च होतो, अश्या वेळी आपल्याला स्वतःला समाधान वाटते का हे अधिक महत्वाचे. लेखन म्हणजे शब्दांचा खेळ. ह्याची सुसंगत मांडणी करून एका सरळ रेषेत शब्दात्मक रूप आपल्याला मांडता आले पाहिजे. लिखाण हे कधीही डोक्याने करू नये ते मनातून आले पाहिजे. कोणताही विषय लिहिताना तो आपल्या मनाला भावला पाहिजे. लेखन म्हणजे मनात आलेल्या भावनांना मेदूच्या सहाय्याने शब्दांकित करून लेखणीच्या सहाय्याने प्रत्यक्षपणे मांडणे असे मला वाटते. लेखन करताना आपण कोणत्या वयोगटासाठी लेखन करत आहोत ह्याचे मुळात आपल्याला भान असणे गरजेचे आहे. लेखन हे नेहमी विषयाला धरून असावे. लिखाण करताना आपण कुठे भरकटत तर नाही आहोत ना ह्याचे आपल्या

How to Read

Image
How to read   वाचन कसे करावे वाचन ही एक कला आहे, ही कला ज्याला जमली त्याने वाचनावर प्रभुत्व मिळविले म्हणून समजा. वाचन करताना तुम्ही कोणता विषय वाचत आहात त्या विषयाला समजून वाचन करावे. माणूस वाचन ज्ञानासाठी, आनंद म्हूणन किंवा आवड म्हणून करतो. विषयाला समजून घेऊन जर वाचन केलात तर ते वाचताना तुम्हाला आनंद मिळेल, आनंद मिळाला की तुम्हाला त्या वाचनाची आवड निर्माण होईल आणि एकदा का आवड निर्माण झाली की तुमच्या ज्ञानात आपसूकच भर पडेल. केलेले सर्व वाचन तुम्हाला समजेलच असे नाही, पण ते समजेल अश्या पद्धतीने आपण वाचन केले पाहिजे. वाचन करताना कोणतेही वाक्य सरसकट वाचू नये. योग्य ठिकाणी खंड पाडून वाक्याचे वाचन करावे. चुकीच्या ठिकाणी खंड पडल्याने वाक्याचा अर्थ बदलतो त्यामुळे खंड कुठे पडावा हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. वाचन करताना 100 टक्के अवधान म्हणजे लक्ष वाचत असलेल्या विषयावर केंद्रित करायला हवे, अन्यथा वाचून स्मरण होण्याऐवजी विस्मरण होण्याची अधिक शक्यता असते. सलग वाचणे जमत नसेल तर ते वाचन टप्या टप्यात करावे. त्यासाठी ठराविक वेळ ठरवावी. मी वाचन आणि लेखन दोन्ही करतो! त्या साठी मी माझा प्रवासातला वेळ स

When the person gets out of mind!

Image
 When the person gets out of mind! व्यक्ती मनातून उतरते तेव्हा! आपण एखाद्या व्यक्तीला मदत करतो किंवा त्याच्या पात्रते पेक्षा जास्त मान देतो अशी व्यक्ती जेव्हा तुमच्या विरुद्ध वागते, बोलते किंवा दुसऱ्यास वागण्यास भाग पाडते तेव्हा अशी व्यक्ती मनातून उतरून जाते. कारण त्या वेळेस आपल्या विश्वासाला न जोडणारा तडा गेलेला असतो. त्या व्यक्तीला मात्र याचा काहीच फरक पडत नाही, कारण मुळात ती व्यक्ती त्याच हेतूने तुमच्या संपर्कात आलेली असते. पण असे करताना त्याच्या पंखात किती बळ आहे हे त्या व्यक्तीलाही माहित नसते. नियतीची मती आणि काळाची गती ही कुणालाच माहित नसते. समोरची व्यक्ती कितीही खालच्या स्थरारावर गेली तरी आपण मात्र तसे वागू नये. प्रत्येलाला आपापल्या कर्माच फळ हे मिळणारच आहे. अशी माणसं समाजात, नात्यात, कामाच्या ठिकाणी सतत सामोरी येतात आणि आपल्याला त्यांच्या सोबत व्यवहार करावा लागतो. आपण सर्व सामान्य माणसं आहोत त्यामुळे अहंकार कुरवाळत बसणं आपल्याला परवडण्या सारखं नाही. त्यामुळे आहे ते वास्तव स्वीकारायचं आणि पुढे चालत राहायचं! हे सर्व मी अनुभवातून शिकलोय. आपण अश्या व्यक्तीवर पुष्कळ विश्वास टाकला हा

Nature

Image
Nature निसर्ग निसर्ग आपल्या जीवनातील अविभाज्य घटक. निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे. निसर्ग शब्द लॅटिन शब्द नतुरा पासून निर्माण झाला आहे. निसर्गामध्ये हवा, पाणी, वृक्ष, पशु, पक्षी, माणसे यांचा समावेश होतो.  निसर्ग आपल्याला पुष्कळ काही देतो पण मनुष्य प्राण्याच्या ओरबाडून घेण्याच्या वृत्ती मुळे सामान्यत:हा निसर्गही बदलत चालल्याचे दिसून येत आहे. निसर्ग आपल्याला पूर्ण पणे कळलेला नाही किंबहुना आपण तो कधी समजून घेतलाही नाही. अश्यावेळेस निसर्गाने रौद्र रूप धारण केले की आपण म्हणतो निसर्गाने मानवला अद्दल घडविण्या साठीच हे रूप घेतले आहे. निसर्गाच्या ह्या रौद्र रूपाचा फटका साक्षात निसर्गालाही बसत असतो. पूर, वादळे ह्यामुळे मनुष्या प्रमाणे झाडे, अन्य प्राणी, पशु, पक्षी जमीन ह्यांचेही नुकसान होते. बऱ्याच अंशी ह्याला मनुष्य प्राण्याला जबाबदार ठरवले तर ते काही चुकीचे ठरणार नाही. निसर्गाचे स्वतःचे अशे अनंत नियम आहेत. त्या सर्व निसर्ग नियमांचा राजा एकाच घोषवाक्यावर काम करत असेल कदाचित ते म्हणजे "क्रिया तशी प्रतिक्रिया". निसर्गात कोणतीही क्रिया केली की त्याची प्रतिक्रिया ही हो

History

Image
 History इतिहास इतिहास म्हणजे भूतकाळात काय घडले ह्याची सुसंगत मांडणी. 'इति+ह+आस' अशी ह्या शब्दाची उत्पत्ती. दुरून पाहिलं तर इतिहास हा काजव्या प्रमाणे वाटू लागतो, पण जस जसे आपण ह्या इतिहासाच्या जवळ जाऊ पाहतो तस तसा तो सूर्या प्रमाणे तेजस्वी वाटू लागतो. इतिहास आपल्याला घडवतो आणि वाचवातोही. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे कालखंड असू शकतात. त्यातील कोणत्याही कालखंडाचा अभ्यास करणे म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूचा सखोल अभ्यास करणे. आता हा अभ्यास कसा करायचा तर भूतकाळातील घटनांची सुसंगत माहिती जमा करायची. प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अश्या कालखंडाला समजून घेऊन अभ्यास करायचा. त्यातून आपल्याला पूर्वी माणसं कशी राहत होती. कोणते अन्न खात होती. कोणत्या प्रकारची वस्त्रे न्हेसत होती. त्यांनी स्वतःमध्ये आणि समाजामध्ये कश्या प्रकारे प्रगती केली. त्यांनी कोणत्या चुका केल्या. त्यांची कशी फसवणूक झाली अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला इतिहास देतो. ही उत्तरे मिळवण्यासाठी आपल्याला भौतिक, लिखित आणि मौखिक साधनाचा वापर करावा लागेल. आता

Giving a shoulder to the deceased

Image
 Giving a shoulder to the deceased मृत व्यक्ती ला खांदा देणे मृत व्यक्तीला खांदा देणे पुण्याचे काम आहे असे सुविचार वजा वाक्य मी त्या दिवशी ऐकले. तो दिवस तसा मला जरा गोंधळवून टाकणारच होता, आमच्या इमारतीत जाधव काकांचे मयत झाले होते. सर्व जण इमारतीच्या खाली जमा झाले. मी ही त्या गर्दीत समावलो होतो. वयस्करांना खुर्चीवर बसवणे आणि कुणी विचारले की "काल रात्री पर्यन्त ठीक होते आज सकाळी असं कसं काय झालं कुणास ठाऊक" हे वाक्य सांगण्याचे मी करत होतो. आता याला काम करत होतो असं तर म्हणू शकत नाही. त्यातील एक गृहस्थ विचारू लागले खांदा कोण देणार आहे बहुदा ते जाधव काकांचे नातेवाईक असावेत. त्यावर पाच सहा जण समोर आले मी विचार करू लागलो..... यातल्या एकालाही मी गेल्या चार पाच महिन्यात पहिले न्हवते. जाधव काका गेल्या चार पाच महिन्या पासून आजारी होते, आमच्या समोरच्या घरात ते राहायचे. त्यांना भेटायला कोण येत कोण नाही हे माझ्याशिवाय जास्त चांगलं अजून कुणाला माहित असणार, असो! मृत व्यक्तीला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र असले तरी तुम्हाला त्याचे पुण्य मीळणार, आधी जर कोणते पाप केले नसेल तरच! मृत व्यक्तील