Posts

Happiness and Sadness

Image
Happiness and Sadness  सुख आणि दुःख म्हणजे काय माझ्यामते सुख आणि दुःख म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू! कोणताही खेळ खेळण्याआधी नाणे उडवून ठरविले जाते कोण पाहिले खेळणार, आणि कोण नंतर. त्याच प्रमाणे जीवनात सुख आणि दुःख ठरवले जाते.  वास्तविक पाहता सुखा मागून दुःख आणि दुःखा मागून सुख ही परिक्रमा चालूच असते. पण ह्या प्रक्रियेत सर्वाना हवं असतं ते सुखं. सुखाची किंमत कोणालाही नसते किंवा ते जास्त वेळ टिकून राहत नाही असं म्हणाना, पण दुःखा चा बाऊ मात्र नक्कीच केला जातो. संपूर्ण पृथ्वीतलावर दुःखी आपणच अशी काही लोकांची धारणा असते. अशी माणसं एक तर स्वतःला संपवतात तरी नाहीतर व्यसनाच्या मागे लागून संसाराची वाट तरी लावतात. काही माणसं मात्र छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद म्हणजे सुख शोधतात, पण अशी माणसं क्वचितच आढळतात. सुख आणि दुःख ह्याची वेगळी अशी परिमिती काढता येणार नाही कारण सुख किंवा दुःख हे आपल्या मानण्यावर आहे, थोडक्यात त्यांचा करता करावीत म्हणजे मन. शेवटी आपलं मनच ठरवतं की  सुख आणि दुःख म्हणजे काय ते. म्हणजे मनाला आनंद झाला की सुख आणि मन दुखावलं म्हणजे दुःख! सगळा काही मनाचा खेळ....

A Horse

Image
A Horse  झालोच घोडा तर घोड्यावर स्वार होण्याची ईच्छा प्रत्येकाच्या मनात संपूर्ण आयुष्यात एकदा तरी येऊन गेली असेलच ना. खोगीर हे घोड्याच्या पाठीवर पट्ट्याने बांधले जाते आणि त्यावर आरामशीर बसून आपण घोड्याची सवारी करू शकतो. जमिनीवर आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये घोड्याचे डोळे सर्वात मोठे असतात. त्यांचे डोळे 360 अंश पाहण्यास सक्षम आहेत परंतु घोडा मनुष्याप्रमाणे लक्ष केंद्रित करण्यास सक्षम नाही म्हणूच घोड्याच्या डोळ्याला झापड लावली जाते. नर घोड्याचा जबडा त्याच्या मेंदूपेक्षा मोठा असतो. नर घोड्याला ४० आणि मादीला ३६ दात असतात. घोडा हा तसा जगभरात आढळणारा प्राणी आहे, त्याच्या बद्दल आपल्याला बरीचशी माहिती असेलही ह्या बद्दल शंका नाही. आता ज्या विषयाबद्दल लिहिणार त्या विषयाबद्दल थोडी तरी माहिती असावी म्हणून हा खटाटोप. मी आज पर्यन्त जंगली घोडे कधी जवळून पहिले नाही. मी पाहिलेल्या घोड्याच्या दोन्ही डोळ्यावर एक झापड लावलेली असते तो घोडा सैरावैरा कुठेही धावू नये म्हणून. अश्या घोड्याना रेसकोर्स वरच्या धावपट्टीत पळवले जाते. लाखोची उलाढाल असते ह्या खेळात. जिवाच्या आकांताने चाबकाचे फटके आणि लगाम खेचली की...

When a Faithful Man Deceives us

Image
When a Faithful Man Deceives us  विश्वासू माणूस आपल्याला फसवत असतो तेव्हा आपण एखाद्या माणसावर पुष्कळ विश्वास टाकतो अगदी आपल्यापेक्षाही जास्त पण तो माणूस खरोखरच त्या विश्वासास पात्र असतो का? आता कुणावर किती विश्वास टाकावा याचं मोजमाप करणार मशीन अजून पर्यंत तरी बाजारात आलं नाही. त्या त्या वेळेस म्हणजे आपल्या गरजेच्या वेळेस जो आपल्यासोबत ठाम उभा राहतो तो आपल्यासाठी जास्त विश्वास पात्र म्हणजे विश्वासू माणूस ठरतो. पण या विश्वासात त्या माणसाचा स्वार्थ लपला असेल तर! अशी व्यक्ती पहिल्यांदा आपला विश्वास जिंकते. आपल्या स्वप्नांच्या जाळ्यात ती व्यक्ती हळूहळू आपले जाळे विणायला सुरुवात करते. जे स्वप्न आपलं असतं ते स्वप्न त्यांचंही असतं फरक एवढाच असतो किती व्यक्ती आपल्याला अंधारात ठेवत असते, पण आपला त्या व्यक्तीवर असलेला आंधळा विश्वास त्या व्यक्तीने दाखवलेल्या रस्त्यावरून आपल्याला जायला भाग पाडते. कालांतराने आपल्या सोबत राहून राहून काही काळ का असेना त्या व्यक्तीची काही स्वप्न काही प्रमाणात पूर्ण होतात स्वप्नांना पंख फुटू लागतात आणि मग चालू होतो तो आपल्या स्वप्नांच जाळ तोडण्याचा खेळ. भिंतीवरच्या ...

Anger and Rage

Image
 Anger and Rage राग आणि क्रोध राग आणि क्रोध ह्या दोन शब्दात पुष्कळ फरक आहे. राग आणि क्रोधच्या मध्ये एका टिशू पेपर ची पात्तळ अशी भिंत आहे. त्यात पाण्याचा एक थेंब जरी पडला तरी रागाचे रूपांतर क्रोधात झाले म्हणून समजा. भगवान शंकरांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि क्रोधाच्या अग्नित काम देवाचा अंत झाला भगवान श्रीरामाने समुद्राला धडा शिकवण्या साठी धनुष्यावर बाण चढवीला होता. महाभारतातील युद्ध दरम्यान क्रोधित होऊन भगवान श्रीकृष्णाने पितामह भीष्म ह्यांच्यावर प्रहार करण्याच्या हेतूने रथाचे चाक उचललेच. युद्धापूर्वी त्यांनी मी हत्यार उचलणार नाही असे सांगितले होते. त्यातून त्यांनी संदेश दिला की प्रसंग - वेळ - परिस्थिती - आवश्यकता - गरज ह्यानुसार माणसाने निर्णय - प्रण - प्रतिज्ञा - निश्चय ह्यात बदल करणे गरजेचे आहे. पौराणिक कथेतून असे ज्ञात होते की अनेकदा देवालाही क्रोध अनावर झाला आहे, पण त्यांनी क्रोधाचा योग्यवेळी आणि योग्य रीतीने वापर केला. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही की आपल्याला राग येतो. प्रत्येकाला वाटते की आपण जे वागतो ते बरोबर आहे, किंबहुना सर्वांनी माझ्या सारखेच वागले पाहिजे. आता प्र...

I Learned From Alcohol

Image
I Learned From Alcohol दारू पासून मी शिकलो मी आज दारू पासून काय शिकलो ह्या विषयावर बोलणार आहे, म्हणजे मी दारू चांगली आहे असे म्हणत नाही. मुळात मला प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकायला आवडते. मसुद्र मंथनातून 14 रत्न निघाली होती, त्यातील हे एक अशुभ रत्न म्हटले तरी चालेल. मद्य असुरांना दिले गेले त्यामुळे त्यांची असुरी वृत्ती अजूनच वाढली गेली. दारू पिल्यावर आपल्यामध्ये विस्मृती निर्माण होते, त्यामुळे शरीरातील ताण तणाव कमी झाल्याचा भास होतो. हळूहळू आपले दारू पिण्याचे प्रमाण वाढू लागते आणि सरते शेवटी आपण दारू पीत नाही तर दारू आपल्याला प्यायला सुरवात करते असो आपण आपल्या विषयाकडे वाळूया. एकदा मी मित्राच्या हळदी ला गेलेलो. अर्थात तिथे दारू ची पार्टी चालली मी त्यात सभ्यपणाचा आव आणून शिरलो. त्यात माझे काही मित्र आणि मैत्रिणी ही होत्या. थोडीशी पिल्यावर मग आत्मज्ञान पाजळायाला सुरवात झाली. मित्र म्हणाला आपल आयुष्य हे ह्या दारू प्रमाणे आहे आणि त्याने ग्लासात दारू ओतली, दुसऱ्याने विचारले कसे काय तर तो पहिला मित्र म्हणाला "आपण जेव्हा बॅचलर असतो तेव्हा शेर असतो" असं म्हणून त्याने सिगारेट पे...

KARMA

Image
KARMA कर्म मी बऱ्याच वेळा हे ऐकत आलो आहे की "कर्म कर, फळाची अपेक्षा ठेऊ नकोस" आपण आपले कर्म राहायचे त्याचे फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्की मिळणार. पण विचार केल्यावर असे जाणवते की पुष्कळ वेळेस कर्म करणारा वेगळा आणि त्याची कर्मफळे खाणारा दुसराच असतो, याला काय म्हणायचे? म्हणजे बघा ना झाडे फळे देतात ती माणूस खातो, गाय म्हैस दूध देतात ते त्यांच्या पिल्लांसाठी पण ते आपण पितो. निसर्ग आपल्याला भरभरून देतो पण आपण मात्र त्याचा नाश जास्त करतो. मनुष्यप्राणी म्हणून आपल्याला स्वछंद जगायचे असते, पण आकाशात भरारी घेणाऱ्या पक्ष्याला मात्र आपल्याला पिंजाऱ्यात ठेवायचे असते स्वतःच्या आनंदासाठी. त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन! जिवंत पशु पक्ष्याना मारून खाल्ले जाते किती यातना होत असतील त्यांना त्या वेळीस. अश्या प्रकारचे कर्म केल्यावर आपण अजून कोणत्या फळाची अपेक्षा कराल. बिजच कडू असेल तर गोड फळ कुठून मिळणार. भगवान श्री कृष्ण ह्यांनी अर्जुनाला समजावून सांगितले. फळाची आशा न धरता कर्त्यव्य कर्म कर, प्रत्येक गोष्ट ही स्वत: साठीच केली पाहिजे असे नाही. त्यात सगळ्यांचे भले व्हावे हा हेतू असायलाच हवा. जर आ...

SHIVJAYANTI

Image
SHIVJAYANTI शिवजयंती  छत्रपती शिवाजी महाराज! असा राजा होणे नाही हे एक अटळ सत्य. जे प्रत्येकाने स्वीकारलेच पाहिजे. "छत्रपती शिवाजी महाराज की जय" नुसता नावाचा उच्चार जरी केला तरी अंगात हजार हत्तींचे बळी येऊन जाते. अशा या राजास माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज हे एक भारतीय राजे आणि मराठी सम्राज्याजे खरे संस्थापक होते आणि शेवट पर्यन्त राहणार. आदिलशाहिच्या जाचातून छत्रपती शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ट ठरली. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले ही काळ्या दगडा वरील पांढरी रेघच म्हणावी लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. गमिनी काव्याच्या तंत्राने  त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अश्या मुघल आणि आदिलशहा फौजांचा यशस्वीपणे सामना केला. छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य घटक आहेत हे कुणी नाकारू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म...